चिखली शहर भाजपाच्या वतीने मृतांना श्रद्धांजली व दहशतवाद्यांचा तीव्र निषेध.....




चिखली: - ज्या जम्मू आणि काश्मीरला संविधानसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतर राज्यापेक्षा वेगळा दर्जा देण्यास नकार दिला होता आणि कलम 370 ला विरोध केला होता तरीही भारत मातेच्या अभिन्न अंग असलेल्या जम्मू आणि काश्मीर भागाला स्वातंत्र्यानंतर सतत अशांत ठेवत सावत्रपणाची वागणूक मिळत असताना देशाचे खंबीर पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी कलम 370 रद्द करून जम्मू आणि काश्मीरला अनेक दशकाच्या वनवासातून मुक्तता दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील अखंड भारत निर्माण केला व जम्मू काश्मीर मध्ये पर्यटन, शांतता व विकास साधत भारत "अखंड हिंदुस्थान" च्या दिशेने वाटचाल करत असताना दहशतवादी देशद्रोह्यांकडून हा घात घडवून आणला गेला.

 भिकार झालेला शेजारी देश आणि त्यांना देशातून समर्थन देणारे देशद्रोही, धर्मद्रोही यांनी शांत, समृद्ध आणि विकसित होत चाललेल्या भारत भूमीचा अखंड भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरला अशांत करून भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी धार्मिक आतंकवाद्यांच्या सहाय्याने जे अघोषित "धर्मयुद्ध" भारत मातेच्या सुपुत्रांचा बळी घेऊन सुरू केले आहे. त्या देशातील व देशाबाहेरील सर्व आतंकवाद्यांना....... करारा जवाब मिलेगा! अशी प्रतिक्रिया आ. सौ. श्वेताताई महाले यांनी दिली आहे.

आज चिखली शहर भाजपा च्या वतीने पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना चिखली येथे श्रध्दांजली वाहण्यात आली तसेच हे नृशंन्स हत्याकांड घडवून आणणाऱ्या पाकिस्थान व दहशतवाद्यांचा निषेध नोंदवण्यात आला.याप्रसंगी चिखली शहर भाजपचे सर्व पदाधिकारी व अनेक सामान्य नागरिक हजर होते.

Previous Post Next Post