दोन लाख किमतीचे १६ मोबाईल चिखली पोलिसांनी केले हस्तगत

ठाणेदार संग्राम पाटील यांचे नेतृत्वात पथकाची कामगीरी चिखली :तालुकात्तील अनेकांचे मोबाईल चोरी तसेच गहाळ होण्याच्या घटना घडल्या नंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करून तब्बल २ लाख २३ हजार रुपयाचे १६ मोबाईल हस्तगत करून सदर मोबाईल मुळ मालकांना परत केले आहे.किमती मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस विभागाचे विशेषत ठाणेदार संग्राम पाटील यांनी केलेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले आहे. सविस्तर असे कि गेल्या काही दिवसांपासून मोबाईल गहाळ झाल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असल्याने चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी पोळीचे अंमलदार विजय किटे,सुनील राजपूत,महिला पोलीस अंमलदार रुपाली उगले यांचे पथक स्थापन करून सदर पथकास गहाळ मोबाईल शोधण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या सदर पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे विविध ठिकाणावरून विविध कंपनीचे सोळा मोबाईल किमत्त २२३०००/- रु.हस्तगत केले यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी A३४ किंमत १५,०००/- रुपये,ओप्पो रेनो ६ किंमत २५,०००/- रुपये,मोटो २०,०००/-रुपये,Oppo A७७ १५०००/-रुपये,Vivo V२७ ३०,०००/- रुपयेVivo Y २१A १०,००० रुपये,Realme ८५३ १०,०००/-रुपये,सॅमसंग ए४ ६,०००/-रुपये,वन प्लस नॉर्ड सीईआर २०,०००/-रुपये,Oppo A५ ५,००० रुपये,रेडमी ५,०००/- रुपये,Oppo Fllpro १४,०००/- रुपये,सॅमसंग गॅलेक्सी A३१ १५,०००/- रुपये,Realme ८ १०,०००/- रुपये,रेडमी १० ८,०००/- रुपये,सॅमसंग A१५ १५०००/- रुपये असे एकुण २,२३,०००/- रुपयाचे १६ मोबाइल हस्तगत करून मूळ मालकांना परत करण्यात आले. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, मा.अपर पोलीस अधिक्षक बि.बि महामुणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस स्टेशन चिखली संग्राम पाटील, पोहेकॉ विजय किटे, पोकॉ सुनिल राजपुत,मपोकॉ रुपाली उगले, पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे.
Previous Post Next Post