न.प.मुख्याधिकारी यांची "बुल्डोजर बाबा" वाली कार्यवाही...

जुना मेहकर रोडवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले चिखली:- अनेक वर्षांपासून असलेले जुना मेहेकर रोडवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले. रस्त्यालगतचे अतिक्रमण ही शहराला लागलेली श्राप असून रस्ता रुंदीकरणासाठी तसेच चिखली शहराच्या विकासासाठी ही अस्थायी अतिक्रमणे अडथळा ठरत असल्याने चिखली मुख्याधिकारी प्रशांत बिडगर ॲक्शन मोडवर येऊन जुना मेहेकर रोडवरील अस्थायी अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली.
चिखली नगरपरिषदेने जुना मेहकर रोड, जयस्तंभ चौकापासून तर मौनीबाबा संस्थांनकडे जाणारा एपीएमसी मार्केटच्या बाजूला असलेले जवळ जवळ १२० अतिक्रमण धारकांना अस्तायीअतिक्रमण काढण्याच्या नोटीसेस दिलेल्या होत्या. १० डिसेम्बर रोजी सकाळीच पोलीस बंदोबस्तात नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आपल्या पूर्ण फौजफाट्यासह जुना मेहेकर रोड या ठिकाणी पोहोचले होते. ट्रॅक्टर्स,जेसीबी व अनेक मजूर हे देखील या मोहिमेत सहभागी झाले होते. नागरिकांना यापूर्वी अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यासाठी देण्यात आलेला नोटीसेसचा निर्धारित वेळ संपल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली.अनेक नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढूनही घेतले होते. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रहदारीसाठी रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद पडत आहेत तसेच शहराच्या विकासासाठी व सौदार्यीकरणासाठी अशी अस्थायी अतिक्रमणे बाधक ठरत असल्याने नगरपालिका प्रशासनाने या अतिक्रमणावर बुलडोजर चालवला.जवळपास १२० अस्थायीअतिक्रमणे या कार्यवाही दरम्यान हटविण्यात आली.
अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्या संदर्भात नोटिसा दिलेल्या होत्या. त्या नोटीसची मुदत २ डिसेंबरला संपलेली होती आणि त्या अतिक्रमण धारकांना काल म्हणजे नऊ तारखेला पुनश्च एकदा आम्ही एक जाहीर दवंडी दिली की २४ तासाच्या आत सगळं अतिक्रमण काढून घ्या अन्यथा नगरपालिका सगळं अतिक्रमण काढेल आणि त्यानंतर होणाऱ्या नुकसानाला नगरपालिका जबाबदार असणार नाही. त्यानंतर १० डिसेम्बर रोजी सकाळपासून आमची अतिक्रमण मोहीम आम्ही चालू केली आणि लोकही स्वतःहून अतिक्रमण काढून घेत होते. तरीदेखील काही अतिक्रमण काढणं बाकी होते ते आम्ही जेसीबीच्या साह्याने काढून घेतले. शहराचचे रस्त्याचचे रुंदीकरण असेल, सौंदर्यकरण असेल यासाठी आम्ही अतिक्रमण मोहीम हाती घेतलेली आहे आणि शहरात इतरही ठिकाणी ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केलं असेल त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून माझी विनंती असेल की त्या लोकांनी अतिक्रमण काढून घ्यावे आणि भविष्यात पण नागरिकांनी शहरामध्ये अतिक्रमण होणार नाही व शहराचे विद्रुपीकरण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,या ठिकाणी सौंदर्यकरणाचा एक प्रस्ताव आम्ही सादर करतोय असेहि खबरबात न्यूजला दिलेल्या मुलाखतीत न.प.मुक्याधिकारी बिडगर यांनी सांगितले.
Previous Post Next Post