नितीन फुलझाडे
देशातील कन्यांच्या कुंकवाची जबाबदारी मा. मोदीजींनी घेतली आहे त्यामुळे देश सुरक्षित हातात.... आ.सौ. श्वेताताई महाले पाटिल
चिखली:- हातामध्ये हिंद देशाची पताका घेऊन डौलात उभी असलेली भारत मातेची प्रतिमा, या भारत मातेच्या लगेच पाठीमागे कर्नल सोफिया कुरेशी व कॅप्टन व्योमिका सिंग यांच्या नेतृत्वात भारत मातेचे सच्चे शिलेदार माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सैनिक, आणि भारत मातेच्या या सैनिकांच्या पाठीमागे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता ताई विद्याधर महाले पाटील यांच्या नेतृत्वात हजारो तिरंगाधारी लोकांची मोठ्या दिमाखात निघालेली तिरंगा रॅली, असे काहीसे स्वरूप आज सकाळी चिखली शहरामध्ये आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संपूर्ण चिखली तालुक्यातून आलेल्या देशभक्तांच्या तिरंगा रॅलीचे होते.
जम्मू काश्मीरमधील बेलगाम येथे आतंकवाद्यांनी दहशतवादी हल्ला केला, त्यामध्ये 26 निरपराध भारतीयांचा बळी गेला. 26 जानेवारी 1950 मध्ये संविधान लागू झाल्यानंतर या देशाने अनेक जातीय दंगली पाहल्या असतील परंतु धर्म विचारून खून करण्यासाठी झालेला हा पहिलाच आतंकवादी हल्ला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला प्रमाण मानून चालणारा हा देश सर्व धर्मातील चांगल्या तत्त्वांचा स्वीकार करून आणि येथील जातीय विविधतेत असलेले सौंदर्य मान्य करून अनेक दशकापासून अगदी शांततेत राहतोय,आणि हेच धार्मिक उन्मादाने मत्त झालेल्या पाकिस्तान सारख्या भिकारी देशाला सहन होत नाही. त्यामुळेच हा देश स्वतः कितीही भुके कंगाल झाला असला तरी भारतासारख्या शांत, संयमी व सहनशील शेजाऱ्याच्या कुरापती काढणे काही सोडत नाही.
परंतु 2014 नंतर "कुणी एका गालावर थापड मारली तर दुसरा गाल समोर करायचा" हे तत्व भारताने नाकारले असल्याने, पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप भारतीयांच्या हौतात्म्याला असेच सोडणे शक्य नव्हते. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी भारतीय लेकीच्या पुसलेल्या कुंकवाचा बदला म्हणून पाकिस्तान मध्ये सैन्य धाडून ऑपरेशन सिंदूर केले, आणि या दहशतवाद्यांचे व दहशतवादी यांना पोसणाऱ्या नापाक सैनिकांचे कंबरडेच मोडून टाकले. ही भारताने युद्धाची केलेली सुरुवातच होती आणि त्यातून पाकिस्तान हा देश जगाच्या नकाशावरून नाहीसे करण्याची धमक असणारे भारतीय सैन्य आणखी पुढे सरकले तर पाकिस्तान जागतिक नकाशावरून गायब होईल ही भीती जाणवताच पाकिस्तानचे पंतप्रधान व पाकिस्तान सरकार संयुक्त राष्ट्र संघाकडे धावून गेले. आपला अंत जवळ दिसताच पाकिस्तानी सरड्याने लगेच रंग बदलायला सुरुवात करून हा आपल्यावर झालेला सैनिकी हल्ला आहे अशी आवई ठोकण्यास संयुक्त राष्ट्रसंघात सुरुवात केली. परंतु जागतिक राजकारणात भारताचा ठसा भक्कमपणे उमटवण्यात सक्षम ठरलेले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी उचललेले हे दहशतवाद विरोधातील पाऊल तुर्की आणि अझरबैजान यासारखे दोन मुस्लिम देश अपवाद वगळता जगातील संपूर्ण 200 देशांनी भारताला पाठिंबा दर्शवून बरोबर असल्याचे जाहीर केले. संपूर्ण जगाने भारताला पाठिंबा दर्शवल्यानंतर गर्भगळीत झालेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघ व ज्यांच्यासमोर भीक मागण्यात त्यांचा संपूर्ण जन्म गेला, त्या अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनवणी केली. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघाने याबाबत भारताकडे विनंती केल्यानंतर भारतातील कोणत्याही भागावर झालेला दहशतवादी हल्ला हा भारतावर झालेला, भारताच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला मानण्यात येईल असे स्पष्ट ठणकावून भारताने आम्ही शांतताप्रिय असलो तरी याचा गैर अर्थ काढण्यात येऊ नये असे स्पष्ट संकेतच जागतिक समुदायाला दिले. भारताची सशक्त, बलशाली परंतु शांतताप्रिय अशी प्रतिमा जागतिक समुदायात निर्माण करण्यात भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यशस्वी झाले. भारताची जागतिक पटलावर यशस्वी झालेली राजकीय नीती, भारतीय सैन्याने या खंबीर परिस्थितीत सर्वस्व पणाला लावून पाकिस्तानला शिकवलेला धडा, आणि भारताने मारलेली थापड तोंडावर घेऊन मिरवणारा पाकिस्तान या सगळ्यांची आठवण इतिहासात राहावी म्हणून ही तिरंगा रॅली काढण्यात आली आहे असे श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या.
युद्धजन्य परिस्थिती निर्माण होताच, सर्व मातृभूमीच्या सैनिकांना सीमेवर बोलावणे आले आणि केवळ दोन दिवसापूर्वीच ज्यांचे लग्न झाले असे केळवद गावचे सुपुत्र अभिषेक भोलाणे हे हळदीच्या ओल्या अंगाने सीमेवर देश रक्षणासाठी गेले.सैनिक आपल्या देशासाठी करत असलेल्या बलिदानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही या शब्दात कौतुक करत आ. सौ. श्वेताताई महाले यांनी सैनिक अभिषेक भोलाणे यांच्या आई, वडील व पत्नी यांचा सत्कार केला याप्रसंगी अभिषेक भोलाणे यांची नवविवाहित पत्नी सौ. मयुरी अभिषेक भोलाणे यांनीही या तिरंगा रॅलीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.
*मी सौ. मयुरी अभिषेक भोलाणे
पाण्यातल्या माशाच बरं असतं तो कितीही रडला तर त्याचे अश्रू मात्र कोणालाच दिसत नाही* . लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सीमेवर बोलावण आलं, आणि मला रडायला आलं..... अभिषेक म्हणाले, "फौजी लाखात एक असतो, पण फौजीची बायको दहा लाखात एक असते ".... हे सीमेवर गेले आणि ते गेल्यावर आयुष्यात पहिल्यांदा अभिमानाने हा देश सैनिकांची किती काळजी घेतो ते कळलं. अगोदर मला माझ्या संसाराची काळजी वाटली म्हणून रडायला येत होते. पण अभिषेक यांनी फोनवर सांगितले, काळजी करू नको, आपली काळजी करनारा एक ईश्वर आहे आणि दुसरा बसलाय न दिल्लीत..मोदीजी आहेत तोपर्यंत या देशाकडे वाकड्या नजरेने पाहायची कुणाची हिम्मत नाही. आज मोदीजी आहेत म्हणून माझ्यासारख्या लाखो मुली नवरा सीमेवर आहे तरी निश्चिन्त आहेत. कारण देशाच्या मुलीच्या कुंकवाची/सिंदूरची जबाबदारी मोदीजींनी घेतली आहे.धन्यवाद मोदीजी. जय हिंद..
या तिरंगा रॅलीमध्ये देश प्रेमाने ओतप्रोत ओथंबलेले हजारो देशभक्त हातामध्ये तिरंगा घेऊन आपल्या देशाच्या सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसून आले. उत्साहाने डौलात तिरंगा मेनू मिरवणारे युवक महिला व पुरुष यांच्या प्रचंड प्रतिसादाने ही तिरंगा रॅली चिखली शहरात दुमदुमली.