*चिखली शहरातील लाकुड ठिय्या मालकांवर कायदेशिर कारवाई करुन वृक्षतोड करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा.* *मनसेची मागणी*
नितीन फुलझाडे
चिखली शहरासह तालुक्यात मोठया प्रमाणात वृक्षतोड सुरु असुन यामुळे पर्यावरणा वर गंभीर परीणाम होत आहे. मात्र सदर विषयांकडे वन विभागाचे संपुर्णपणे जाणिवपुर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासुन चिखली शहारातील जाफ्राबाद रोड वरील खबुतरे ले. आऊटच्या पाठी मागे मोठ-मोठी लाकडे तोडुन या ठिकाणी जमा केल्या जातात. सदरची लाकडे वाळल्यानंतर संबंधित व्यक्ती ती लाकडे घेऊन जात त्या ठिकाणी पुन्हा नव्याने वृक्ष तोडुन लाकडे जमा करीत असतात. सदरचा प्रकार गेला कित्येक वर्षापासुन सुरु असुन सदर विषयांची वन विभागाला पुर्णपणे जाणिव आहे.
या ठिकाणी दररोज वृक्षतोड करुन साठवणुक केल्या जाणाऱ्या लाकुड ठिय्या बाबत गत काही दिवसांपुर्वी वनपाल खान यांना मनसेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन माहिती दिली होती. मात्र त्यांनी प्रत्यक्ष मोक्यावर येऊन कोणतीही पाहणी केली नाही पंचनामा केला नाही मात्र उलट लाकुड तोडयांनी त्या ठिकाणाहुन तात्काळ साठवणुक केलेल्या लाकडांची इतरत्र ठिकाणी हलविण्यांस सुरुवात केली त्यामुळे असे स्पष्ट निदर्शनास येते की, संबंधित क्षेत्रातील वन अधिकारी व वनपाल यांच्या छत्र छायेखाली हजारो वृक्षांची तोड दररोज होत असुन त्यांची याला पुर्णपणे संमती असून त्यांनीच या लाकूडतोड्यांना सावध केल्याचा संशय येत आहे.
त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक 23 मे 2025 रोजी उपवनसंरक्षक वन विभाग बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये नमूद सदर तोडलेली लाकडे कुणाची आहे याची चोकशी करुन संबंधित व्यक्तीवर व सर्व बाबींची माहिती असुन सुध्दा जाणिवपुर्वक काना डोळा करणाऱ्या वन अधिकारी, वनपाल यांच्या वर कायदेशिर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, मधुकर ठेंग उपस्थित होते.