सर्वोदयी रामकृष्ण आढे यांनी ग्रामस्वराज्याचे विचार केळीवेळी च्या मातीत रुजविले-- डॉ. संजय खडक्कार
नितीन फुलझाडे
अकोला-- ज्येष्ठ सर्वोदयी रामकृष्ण आढे यांनी महात्मा गांधी,विनोबांचे ग्राम स्वराज्याचे विचार केळीवेळी पंचक्रोशीसोबतच विदर्भात सर्वत्र पदयात्रा करून रुजवले असे प्रतिपादन विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ संचालक प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी केले.
स्व.रामकृष्ण आढे स्मृती समिती केळीवेळी चे वतीने आयोजित 22वा विदर्भभूषण पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत होते. सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ग्राम मंडळाचे प्रमुख गुरुदेव किशोर बुले, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. शिवचरणसिंह यदु,स्व. रामकृष्ण आढे स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ. महेंद्रसिंह ठाकूर, विदर्भ भूषण पुरस्काराचे मानकरी प्रल्हादराव नेमाडे यांची विचारपीठावर उपस्थिती होते.
सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते स्व.रामकृष्ण आढे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उरळ तालुका बाळापूर येथील कापूस ते कापड अभियान राबविणारे सर्वोदयी कार्यकर्ते प्रल्हादराव नेमाडे यांचा याप्रसंगी डाॅ.संजय खडक्कार यांचे हस्ते सपत्नी खादी वस्त्र, सन्मानपत्र व विदर्भभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्रसिंह ठाकूर यांनी केले पाहुण्यांचा परिचय डॉ. शिवचरण सिंह यदु यांनी करून दिला. सन्मान पत्राचे वाचन सुनील अवचार यांनी केले.
विदर्भात मोठ्या प्रमाणावर असलेला जलसिंचनाचा अनुशेष आ भरून काढण्याची गरज आहे. समृद्धी सारखे महामार्गावर होणारा खर्च जलसिंचनावर केला तर विदर्भाला गतवैभव प्राप्त होईल. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्येला आळा बसेल असे प्रतिपादन प्रा. डॉ.संजय खडक्कार यांनी याप्रसंगी केले.
प्रल्हादराव नेमाडे
---------------------------
सत्काराला उत्तर देताना प्रल्हादराव नथुजी नेमाडे यांनी आपल्या शेतातील कापसापासून कापड बनवणे हा आपला संकल्प होता. तो आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कापूस वाचला तर देश वाचेल. नद्या जिवंत राहिल्या तर आपले पर्यावरण सुरक्षित राहील. कापूस ते कापड या अभियानातून प्रत्येक हाताला काम आणि दाम मिळवून देण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन केले.
बबनराव कानकिरड
-------------------------- रामकृष्ण आढे हे कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या प्रेरणेने अनेक क्रीडापटू तयार झाले. अनेक कार्यकर्त्यांनी सर्वोदय चवळीला वाहून घेतले. रामकृष्ण आढे यांच्या विचारांचा वारसा आणि वसा असाच पुढे चालू ठेवण्याचे आवाहन सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
किशोर बुले
-----------------------
रामकृष्ण आढे केळीवेळी गावाचे भूषण होते. त्यांच्या प्रेरणेने या गावाला नाव मिळाले.म्हणून त्यांचा स्मृतिदिन ग्राम मंडळामार्फत मोठ्या प्रमाणावर साजरा करणार असल्याचे प्रतिपादन ग्राम मंडळ प्रमुख गुरुदेव किशोर बुले यांनी केले.
याप्रसंगी चेतना ऑरगॅनिक ग्रुप व आढेजींचे नातू महेश आढे यांनी निर्मित केलेल्या रामकृष्ण खादीचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन सुनील अवचार यांनी केले. आभार प्रदर्शन महेश आढे यांनी केले.
सर्वश्री निरंजन बोर्डे, रामदास टवरे, श्रीकृष्ण वाघमारे, वासुदेवराव कुठे, अनंतराव सरदार, गजानन मुंडे,गजानन चिलात्रे, रत्नदीप थोरात, प्रमोद सुरे, अनिल आढे ,रविकांत आढाव, विठ्ठलराव आडे, संतोष सुरे, एकनाथ आढे, सुरेश गवळी, रवींद्र सिंह राजपूत, जनार्दन गावंडे, सुभाष भाऊ ठाकरे, संजय वाघमारे ,गौतम भटकर, गौरव आडे, अनुप मुंढे ,सुरज बुले, शरद पाचपोर ,राजीव आडे, संजय वाघमारे शुभम वाघमारे गोलू ठाकरे रामेश्वर अत्तरकार गजेंद्र , अमोल चिलात्रे, रमेश बुले ,दामोदर आडे ,हिम्मतराव गावंडे, रामदास आडे ,तुषार हिवरे, वैभव उनवणे दिलीप आढे, नितीन भरणे ,अनुप आडे, धनराज आडे, वैभव आढे, शामराव बकाल, गजानन गावंडे ,कृष्णा ताठे, शिवाजी वानखडे यांचे सह सर्वोदय मंडळ , नशा बंदी मंडळाचे कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.