*नितीन फुलझाडे*
ज्या दिवशीची तक्रार त्याच दिवशी निपटारा करणार..... आ. सौ. श्वेताताई महाले पाटील
मतदार संघातील कोणताही नागरिक आपली समस्या घेऊन आमच्या निवासावर केव्हाही येऊ शकतो आणि त्याच्यासाठी अगदी कोणतेही क्षणाला लोकप्रतिनिधी म्हणून व त्यांच्या घरातील एक सदस्य म्हणून मी केव्हाही सहज उपलब्ध राहू शकते आणि उपलब्ध असते परंतु त्या वेळेला प्रशासकीय अधिकारी त्याच्या कामासाठी उपस्थित राहू शकत नाही त्यामुळेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन माझ्या जनतेच्या गाऱ्हाण्यांना न्याय मिळावा म्हणून या जनसंवादाद्वारे मी तुमच्यात आले आहे असे उद्गार चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी पंचायत समिती कार्यालय चिखली येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमांमध्ये काढले.
पंचायत समिती चिखली द्वारे आयोजित लोकसंवाद या कार्यक्रमात लोकांना शासकीय कार्यालया संबंधित असलेल्या समस्या व लोकांच्या तक्रारी, ऐकून घेऊन त्याचा योग्य तो निपटारा करण्याच्या उद्देशाने आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका छताखाली जनतेच्या सर्व तक्रारी सोडवण्याच्या उद्दिष्टाने गटविकास अधिकारी श्री गजानन पोफळे यांच्या मार्गदर्शनात सर्व खात्याचे प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमाला हजर होते. ज्या दिवशी ची तक्रार त्या दिवशी त्या तक्रारीचा निपटारा असे उद्दिष्ट ठेवून या लोकसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे असे या लोकसंवाद कार्यक्रमाचे प्रास्तविक चिखली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री गजानन पोफळे यांनी केले.
समाजातील सर्व सामान्यांसाठी हा जनसंवाद आयोजित करण्यात आलेला असून यामध्ये प्रत्येकाच्या तक्रारी आपण ऐकून घेणार! त्यावर उपाय देणार!त्यासाठी प्रत्येकाने आपले म्हणणे किंवा आपली तक्रार लेखी निवेदनासह द्यावी व प्रत्येक लेखी निवेदनावर पंधरा दिवसात प्रत्यक्ष कारवाई करण्यात येणार! असे आश्वासन आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी दिले.
चिखली विधानसभा मतदारसंघासाठी जवळपास 700 किलोमीटरचे शेत रस्ते विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण मंजूर करून आणले होते. परंतु शेत रस्त्यामध्ये राजकारण करण्याच्या काही लोकांच्या घाणेरड्या सवयीमुळे बरेच शेत रस्ते अद्यापही अपूर्ण आहे याची आपल्याला जाणीव असून अतिशय पारदर्शक पद्धतीने सगळे शेत रस्ते पूर्ण करणारच अशी हमी आमदार सौ श्वेता ताई विद्याधर महाले यांनी दिली.
जिवंत सातबारा ही चिखली तालुक्याने संपूर्ण राज्याला दिलेली देणगी असून जिवंत सातबारा हा पथदर्शी प्रकल्प सर्वप्रथम चिखली तालुक्यात सुरू झाला त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तो संपूर्ण जिल्हाभर राबवण्यासाठी आदेश दिले व या प्रकल्पाचे महत्त्व पाहून महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी हा प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवण्याचे आदेश दिले.
हा जिवंत सातबारा प्रकल्प राबवण्यासाठी विशेष मेहनत घेणारे तहसीलदार श्री संतोष काकडे त्याचप्रमाणे चिखलीचे थानेदार श्री संग्राम पाटील यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्यामुळे त्यांचा सत्कार आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे श्री संजय चौधरी यांनी आय गॉट भारत अंतर्गत सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून संपूर्ण विभागातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकसंवादाच्या या अभूतपूर्व कार्यक्रमाप्रसंगी श्री सुरेश अप्पा खबुतरे, विजय कोठारी,जिल्हा परिषद बुलढाणा चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरात, श्री शरद पाटील एसडीओ बुलढाणा, यांच्यासह चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत बिडगर, श्री कृष्णकुमार सपकाळ, श्री अमोल साठे, सागर पुरोहित, संजय गाडेकर, युवराज भुसारी, यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी हजर होते.