"स्टार्टअप ही लोकचळवळ व्हावी"...... आ. सौ. श्वेताताई महाले

 


नितीन फुलझाडे 

 राष्ट्रीय नवोद्योजक कार्यक्रम व वेंडर डेव्हलपमेंट समिट मध्ये आमदार सौ श्वेता महाले यांनी नवोद्योजकांना केले मार्गदर्शन...


• एक काळ असा होता की भारताचा व्यापार संपूर्ण जगभर पसरलेला होता. प्रत्येक घरामध्ये लघु व कुटीर उद्योग चालत असे. त्यामुळेच येथून सोन्याचा धूर नीघायचा, असे म्हटले जायचे. आपला देश मुळातच पूर्वीपासून संपन्न राष्ट्र होते. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात देशात सोन्याचा धूर पुनः नीघताना पाहायला मिळणार आहे

यात शंका नाही. यासाठी स्टार्टअपला एक लोकचळवळ बनवणे गरजेचे आहे.

२०१६ मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्ट अप इंडिया या योजनेची सुरुवात केली होती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी महाराष्ट्र मध्ये पोषक वातावरण तयार केले . मेक इन महाराष्ट्र, इज ऑफ

डुइंग बिजनेस च्या माध्यमातून उद्योगस्नेही राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण केली. त्याचे फलित म्हणून यंदा दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जवळपास १६ लाख कोटी रुपयाचे

सामंजस्य करार केले गेले. देशाच्या इतीहासात प्रथमच एवढी परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याला यश आले.

परकीय गुंतवणूक आणि व्यापारामध्ये राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि ही आम्हा सर्वांसाठी अतिशय गर्वाची बाब आहे. भारतीय व्यापाराचा इतिहास, भारताची सध्याची उद्योगस्नेही व्यापारनीती, महाराष्ट्राचे सर्वांचा विकास अभिप्रेत असलेले उद्योग स्नेही धोरण, आणि सर्व सामाजिक स्तरात एक विश्वास निर्माण करून महाराष्ट्राने देशात उद्योग व व्यापार यात मिळवलेले अग्रेसरत्व याबद्दल बोलताना चिखलीच्या आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी हे गौरव उद्गार काढले.



 इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स फॉर इंक्लुसिव्ह बिझनेस अँड इंडस्ट्री यांच्यामार्फत मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नवउद्योजक समिट अँड वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम 2025 या भव्य कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहलेल्या  चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार विकासकन्या सौ. श्वेताताई महाले पाटील उदयन्मुख नवउद्योजकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.


 दिनांक 25 मे 2025 रोजी मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज बीकेसी येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय नवोद्योजक समिट व विक्रेता विकास कार्यक्रमांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून उद्योजक, नवउद्योजक स्टार्टअप्स, महिला आणि अनुसूचित जाती जमातीतील तरुण सहभागी झाले होते. या उद्योजक, नउद्योजकांमध्ये विदर्भ विभागातील विशेषता बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील प्रतिनिधींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. राज्यभरातील उद्योजकांना शासकीय योजना, उद्योगाच्या संधी, वेंडर डेव्हलपमेंट, बँकिंग सल्ला व उद्योग धोरणाबाबतच्या थेट संवादाची ही संधी आमदार सौ श्वेताताई महाले यांना प्राप्त झाली.


 महाराष्ट्राच्या ग्रामीण व महिला उद्योजकतेचे प्रभावी प्रतिनिधित्व करत असून त्यांनी आपल्या प्रेरणादायी कार्यामुळे युवकांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळेच आमदार सौ श्वेता महाले यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे राज्यातील नवोद्योजकांना निश्चित दिशा व प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली होती. त्या धर्तीवर बोलतांना सौ. श्वेताताई महाले उपस्थितांशी संवाद साधताना दिसल्या.


 या कार्यक्रमाला नॅशनल स्टॉक एक्सचेंज व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष कुमार चव्हाण तसेच डॉक्टर अशोकराव माने (आमदार), त्याचप्रमाणे राज्यभरातील लघु व सूक्ष्म उद्योग करणारे उद्योजक तसेच खादी ग्रामोद्योग बोर्ड व विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्रातील 200 हून अधिक उद्योजक, उद्योग भागीदार यांचा समावेश होता.


 बुलढाणा जिल्ह्यातील व अकोला जिल्ह्यातील अनेक नवोद्योजक या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याने या नवउद्यमींना प्रेरणा देऊन त्यांना ग्रामीण भागामध्ये नवउद्योग स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे. एक खिडकी योजनेद्वारे गरजेचे असणाऱ्या सगळ्या परवानग्या एकाच ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देणे, उद्योग व्यवसाय टाकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून देऊन  त्यांच्या वैयक्तिक विकासाबरोबरच समाज, जिल्हा, राज्य व पर्यायाने राष्ट्राचा विकास संपन्न होईल, अशी तजवीज करणे याला आपला प्राधान्यक्रम राहील असे आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या.


आपले राज्य स्टार्टअप च्या बाबतीतही देशात क्रमांक एकवर असल्याचे आमदार सौ महाले म्हणाल्या पुढे बोलताना, राज्यात २८ हजारहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या स्टार्टअप च्या माध्यमातून ३

लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत.

 यापैकी तब्बल १४ हजाराहून अधिक स्टार्टअप महिला नेतृत्वाखाली सुरू आहेत. म्हणजेच ५० टक्के

स्टार्टअप महिलांच्या नेतृत्वात चालवले जात आहे ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या. नव्याने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी स्टार्टअप साठी सज्ज व्हावे, देवाभाऊं ची टीम तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याची मी खात्री देते असे व्यासपीठाच्या माध्यमातून सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.


 स्टार्टअप साठी  कधी नव्हते एवढे पोषक वातावरण येथे आता तयार झाले आहे. याचा महिला नवउद्यमींनी फायदा घ्यावा व समाज आणि राष्ट्र निर्मितीसाठी स्टार्टअप च्या माध्यमातून आपले योगदान द्यावे असे आवाहन श्वेता ताई महाले पाटील यांनी केले.


मी प्रतिनिधित्व करत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातून तसेच अकोला, वाशिम सह विदर्भातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर येथे नवउद्योजक आलेले दिसत आहेत, ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. 

 मला याचा विशेष आनंद आहे की विदर्भातील नऊ उद्योजकांमध्ये देखील उद्योगासाठी आवश्यक असणारी जिद्द  नवनिर्माणाची भावना, नवीन संधी शोधण्याची आणी त्याचे

यशस्वी उद्योग वा व्यवसायात रूपांतर करण्याची क्षमता आहे. या कार्यक्रमाच्या 

माध्यमातून तुम्ही आपापल्या जिल्ह्यात उद्योजगतेचा नवा आदर्श निर्माण कराल


• येणाऱ्या काळात स्टार्टअप ची ही चळवळ शहरातून गावापर्यंत पोहोचवायची आहे  यामध्ये देशाला अभिमान वाटेल इतका विदर्भ आघाडीवर असेल याची मला खात्री आहे असे अभिमानाने सौ. श्वेता महाले पाटील म्हणाल्या.

Previous Post Next Post