रणरागिणी विकासकन्या सौ. श्वेताताई महाले यांनी फक्त अडीच वर्षात विकास काय असतो ते संपूर्ण मतदारसंघाला दाखवून दिले....
जे गेल्या ६० वर्षात झाले नाही ते अवघ्या काही दिवसात या माय माऊलीने करून दाखवले. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. असा एकही समाज नाही की त्याची विकासकामे केली नसतील. पण काही लोकांनी सोबत राहून कामे करून घेतली आणि निवडणूक लागली तर विरोधात जाऊन बसली. अशा लोकांना नेमकं हव तरी काय असते?
ताईंनी प्रत्येकाला पाच वर्षात मानपान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, प्रत्येकाच्या सुखा दुःखात सहभाग घेतला.. चिखली शहरात कोट्यवधींची विकासकामे केली. शहराचा चेहरा मोहरा बदला; तर ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्या, सभागृह, सामाजिक भवन, महामानवांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण, शेत रस्ते, दोन गावांना जोडणारे रस्ते, आरोग्याच्या सुविधा, शेतकऱ्यांची वीजेची समस्या मार्गी लावली. दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. ताई व भाऊजी यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचे काम केले... प्रत्येक घटकाला फुल ना फुलाची पाकळी दिल्या गेली. मग तो कोणत्याही समाजाचा असो; भेदभाव कधी केला नाही. प्रामुख्याने मराठा समाजाला मंगल कार्यालय, राजपूत बांधवासाठी समाज भवन, मुस्लिम समाज बांधवांसाठी शादीखाना, रस्ते तर दलित समाज बांधवांसाठी सामाजिक भवन, संविधान भवन, रस्ते व शहरातील प्रत्येक समाजाला नगर परिषदेची जागा मिळवून देत त्या समाजाला लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या... मतदारसंघातील राज्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचे काम प्रामाणिकपणे ताई व भाऊजी ह्यांनी केले. जे काम मुंबईत चकरा मारून होत नसे ते काम तात्काळ करून दिले. त्याची जात, त्याचा समाज कधी विचारला नाही. फक्त हा आपल्या मतदारसंघातील आहे एवढंच पाहण्यात आल...
रात्रंदिवस माय बाप जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेतली.. पण जनतेला विकास नको ,सुलभ होणारी कामे नको. ह्याच जनतेने निवडणुकीत काय दिलं ? तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे. निवडणुकीत पायाला गंभीर दुखापत असतांना सुध्दा प्रचार केला. प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.. अनेक मातब्बर विरोधात होते. त्यांना ताई व भाऊजींचा असलेला स्वभाव आणि विकासकामे नकोत; ह्या जनतेला विकासापासून वंचित ठेवायचं आहे. म्हणून हे सर्वजण ताकतीने एकवटले होते.. त्यांनी खूप प्रयत्न केले पण सामान्य जनता मात्र रणरागिणीच्या सोबत होती..
अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. शहरात काही मतांनी विरोधी उमेदवार समोर होता.. काही समाज बांधवांनी तर फटाके फोडूत नारे दिले. स्वतःच्या पायाला गंभीर दुखापत असताना प्रचार करून नागरिकांशी संवाद साधला. जन आशीर्वाद द्यावा हीच विनंती केली. विकासकामे करून चूक झाली का ? शेतकरी, कष्टकरी, वंचित, शोषित, पीडित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही चूक आहे का ? आमदारकी सोडा... महाले साहेब गेल्या २० वर्ष पासून मोठे अधिकारी आहेत. त्यांनी लाल - पिवळा दिवा जवळून पहला. पण एक बहुजन समाजातील महिला मतदारसंघाचं चागल्या प्रकारे नेतृत्व करते हे काही मातमब्बर नेत्यांना रुचले नाही. त्यांनी काटेकोर प्रयत्न जाते त्यांना पाडण्याचे, पण त्यांचा डाव गोरगरीब सामान्य जनतेने धुडकावून लावला.
निवडणुका येतात आणि जातात... पण माणसाचे मन मात्र खराब होते. आता तरी सर्वांनी बोध घ्यावा आणि नवीन ताकतीने कामाला लागावे. जो आपला विकास करेल तोच आपला पक्ष, आपला नेता हीच भावना मनात ठेवावी. जेणे करून ह्या मायबाप जनतेचा कायापालट होईल. कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. पक्ष प्रवेश झाले. नवीन आलेल्या लोकांनी काय केले हे सर्वांना माहीत आहे. आपल्या भागाचा, आपल्या गावाचा, आपल्या वाड्याचा, आपल्या प्रभागाचा विकास करून घ्यावा जेणे करून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. जो आपल्याला मदत करेल आपण त्याच्या पाठीमागे शक्तीनिशी उभे राहायला पाहिजे. विरोधी माजी आमदार ह्यांनी १० वर्षात काय केले सर्वांना माहीत आहे. त्यात खोलात जाण्याची गरज नाही. पण नेते व कार्यकर्ते ह्यांनी ह्यातून शिकावं. आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यासाठी आपण आपल्या तयारीने राहीलं पाहिजे. कोणावर अवलंबून न राहता तयारी करावी.
येणारा काळात श्वेताताई पुन्हा आपली विकासकामे करणार आहेत. त्यांच्या हातून ह्या मतदारसंघाचा कायापालट होणार आहे. विकासकामे त्याच जोमाने सुरू राहणार आहेत. ह्या गोर गरीब जनतेचा विकास करणे, प्रत्येकाला शासकीय योजनेचा लाभ मिळून देणे हाच श्वेताताईंच्या राजकारणाचा मुख्य हेतू आहे. आता तरी काही नागरिकांनी सुज्ञ व्हावे. येणाऱ्या काळात सोबत राहावे. रणरागिणी मोठ्या संघर्षाने निवडून आली ही लढाई सोपी नाही हे येणारा काळ आपल्याला सांगेल .ताई व भाऊजी ह्याचे जे स्वप्न आहे. आपल्या माय भूमीचा विकास करणे हे जे ताई आणि भाऊजींचे स्वप्न आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. या स्वप्नपूर्तीसाठी चला पुन्हा नव्या दमाने कंबर कसूया! नव्या जोमाने,नव्या दमाने तयारीला लागूया!!🙏🏻
आपला
सुरेश इंगळे पाटील
स्विय सहाय्यक
आ सौ श्वेताताई महाले पाटील

Tags
चिखली विधानसभा...