समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठान तर्फे स्वातंत्र्यवीरांना अभिवादन



चिखली : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांची ५९  वी पुण्यतिथी दि. २६  फेब्रुवारी रोजी साजरी झाली. या निमित्त समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या  वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ एड.  मंगेश व्यवहारे, समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रेणुकादास मुळे, सचिव संजय भालेराव, संचालक सखाराम राऊत, सामाजिक कार्यकर्ते भगवान निंबाळकर, श्रीरंग जोशी अर्जुन मुळे, श्रीरंग भोकरदनकर यांच्यासह अनेक  कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post