छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुरोगामी विचारांमुळे स्वराज्य निर्माण केले - सदानंद मोरे

चिखली:- छत्रपती शिवाजी महाराज यांनी तळागाळातील अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन विज्ञान वादी दृष्टिकोन ठेवून स्वराज्य निर्माण केले. कै. लक्ष्मीबाई माध्यमिक आश्रम शाळा शिवणी आरमाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी करतांना सदानंद मोरे बोलत होते ते म्हणाले जिजाऊ मांसाहेब यांनी स्वतःच स्वराज्य असाव हा विचार शिवबाच्या मनात रुजवला. कोणते व्रत उपवास नवस केले नाहीत. स्वराज्यावर आधारित कल्याणकारी लोकशाही बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तयार केली.. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणं केली. त्यानंतर सिद्धार्थ काळे.सुरेश जायभाये. प्रा. आरमाळ मुख्याध्यापक एन के पडघान यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आर ए नागरे यांनी केले तर आभार बी आर पवार यांनी मानले. यावेळी प्रा खरात. आर एल चेके. मोहन घोंगे. आर वी तेजनकर गणेश शिंदे. विनोद आरमाळ शांताबाई शिंगणे शालू झिने उपस्थित होते.
Previous Post Next Post