चिखली : - गेल्या 30 वर्षा पासून दैनिक देशोन्नती मध्ये निर्भीड व शोध उत्कृष्ट पत्रकारिता उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट वृत्तकथा, उत्कृष्ट समाज कार्य करणारे पत्रकार प्रताप मोरे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण येत्या 30 डिसेंबर रोजी सा खेर्डा येथे होणार असल्याने परिसरात त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे.
प्रसिद्धी पत्रकानव्ये कळविण्यात आले आहे की , दै. भारत संग्राम व स्व. मधुकर खंडारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त तसेच समाजभूषण अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त साखरखेर्डा येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट वृत्तकथा, उत्कृष्ट समाज कार्य स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृती लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 30 वर्षांची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि आज पर्यत त्यांची कामगिरी हे पाहुण दैनिक देशोन्नती मध्ये सतत 30 वर्षापासून उत्कृष्ट काम करणारे प्रताप मोरे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार येत्या 30 डिसेंबर रोजी सा खेर्डा येथे मान्यवराच्या हस्ते बहाल करण्यात येणार असल्याचे समाज भूषण अर्जुन गवई तथा , दै. भारत संग्राम चे जिल्हा प्रतिनिधी सचिन खंडारे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या पुरस्कारामुळे जिल्ह्यातील सर्व पत्रकार, लोकप्रतिनिधी, तथा गावाकरी व मित्र मंडळामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.