बुलडाणा- परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यु झाला. तसेच बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्या ॲड.जयश्री शेळके यांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथे समाजकंटक व्यक्तींकडून संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेमुळे सर्व संविधानप्रेमी दुखावले गेल्याने त्यांच्याकडून परभणी शहरात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने आरोपीला तत्काळ अटक करुन कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु पोलीसांकडून आंदोलन करणाऱ्या संविधानप्रेमींवर अमानुष लाठीचार्ज करण्याचे निंदनीय काम केले आहे. कारवाई दरम्यान विटंबना करणाऱ्या मुख्य आरोपीला सोडून आंदोलनकर्त्या सोमनाथ सुर्यवंशी या विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. सोमनाथ सुर्यवंशी न्यायालयीन कोठडीत असतांना पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत त्याचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ॲड.जयश्री शेळके यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे देखील काही दिवासांपुर्वी अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात मागील वर्षभरात जवळपास ३२ हत्येच्या घटना घडल्या आहेत. तसेच सोमनाथ सुर्यवंशी सारख्या उराशी अनेक स्वप्न बाळगणाऱ्या एका विद्यार्थ्याचा संविधान संरक्षणासाठी पोलीस कोठडीमध्ये मृत्यु होणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा स्वरुपाचे अपराध घडणे हा चिंतेचा विषय आहे. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्युला जबाबदार असलेल्या सर्व पोलीसांना निलंबित करावे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देऊन सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्या ॲड.जयश्री शेळके यांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मा.आमदार हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष तुळशीराम काळे, शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष लखन गाडेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकास, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर, आशिषबाबा खरात, एकनाथ कोरडे, जाकिर कुरेशी, सत्तार कुरेशी, अब्दुल कुरेशी, राहुल जमादार, अनिकेत गवळी, मो.सोफियान, सलीम पठाण, सय्यद बिल्लाल डोंगरे, मो.सादिक, शेख इलीयात अमीर, मो.शाकीर, नवेद हुसेन, इकबाल अहेमद खान, शेख अकील, शेख करीम, शेख नूर मोहम्मद, शेख इब्रामान, नदीम शेख, शेख इकबाल कुरेशी, मो.जावेद मो.फारुख, शेख मोइन शेख सलीम, शेख अकसर शेख हैदर कुरेशी, शेख लाल शेख महेबूब, मो.जावेद, विजय राऊत, बाला राऊत, विनोद गवई, अविनाश जाधव, श्रीकांत जाधव, धनंजय बाहेकर, निलेश पाटील, स्मिता वराडे, सपना इंगळे, किर्ती परिहार, वंदना जवंजाळ, उदय देशमुख, संदीप बोर्डे इ.उपस्थित होते.
Tags
आपल बुलडाणा...