"स्वत:मध्ये सात्विक ऊर्जा निर्माण करा..!" – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज

 "स्वत:मध्ये सात्विक ऊर्जा निर्माण करा..!" – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज

 अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी हजारों भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला. 

             सकाळी नऊ वाजता जगद्गुरुश्रींचे आगमन झाले त्यानंतर यजमानांनी जगद्गुरुश्रींचे पाद्य पूजन केले. अशा भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली, तद्नंतर उपस्थित सर्व भक्तगणांना जगद्गुरुश्रींनी अमृतमय मार्गदर्शन केले. 

त्यावेळी जगद्गुरुश्रींनी असे म्हटले की "तुझं आहे तुझपाशी परी वेड्या जागा चुकलासी" म्हणजेच तुमच्या अडचणी तुम्ही स्वतः सोडवता फक्त दररोज दिवसातून दहा मिनिटे नामस्मरण करा व स्वप्नातही कोणाचं वाईट चिंतू नका त्याचप्रमाणे "तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा" हा बहुमोल असा संदेश भक्तगणांना दिला. अध्यात्म मार्गावर चालत असताना आपणास संसार - प्रपंच त्यागण्याची काहीही गरज नाही, संसारात राहून सुद्धा आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. फक्त सद्गुरूंनी सांगितलेल्या वचनाचे पालन करा व नियमित भक्ति करा आणि थेंबा थेंबाने सात्विकता वाढवा असे जगद्गुरुश्रींनी सांगितले. 

अध्यात्मात आपल्यातील रजोगुण व तमोगुण त्यागून सात्विकता वाढवणे खूप गरजेचे आहे. सात्विकता आपल्यात एक ऊर्जा निर्माण करते. आलेल्या भक्तांना मार्गदर्शन करतांना जगद्गुरुश्री म्हटले की "गजानना तुझ्या आम्ही पायातील वहानं, याचक तुझे आम्ही द्यावे समाधान " आम्ही स्वतःला गजानन महाराजांच्या पायातील वहान मानतो आणि संपूर्ण संप्रदायांमध्ये चालत असलेले कार्य हे सर्व काही गजानन  महाराजांच्या कृपेने होत आहे. जळी-स्थळी काष्टी-पाषाणी म्हणजेच कणाकणात देव वसलेला आहे. फक्त आपण त्यांच्या चरणाची अखंड शरणागत झालो पाहिजे. 

आपले संपूर्ण जीवन त्यांच्या चरणावरती अर्पण करून "मारणार तोच, तारणार  तोच" असा श्रद्धा भाव ठेवून विश्वास ठेवायचा व समर्पित भावनेने शरण जावे. आपली जशी भगवंतावर श्रद्धा असते तसा तो फळ देत असतो त्यामुळे भगवंतावर श्रद्धा व निस्वार्थ प्रेम करायला हवं "जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ देतो रे ईश्वर.!"



          जगद्गुरुश्रींनी सांगितले की आपल्या मध्ये सात्त्विक उर्जा तयार करणे गरजेचे आहे. जेणे  करून आपल्या मध्ये अधिकाधिक सात्त्विकता वाढून , रजो व तमो गुण आपोआप कमी होईल.      

         जगद्गुरुश्रीं आपल्या अमृतमय प्रवचनात म्हटले की आपन आध्यात्मिक शास्त्राला शास्त्रीय भाषेत अभ्यासले पाहिजेत. अंधश्रद्धा व अध्यात्म यातील फरक समजून आपले मन अध्यात्मवादी, बुद्धी वास्तववादी व डोळे विज्ञानवादी ठेवले पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये बिनचूक निर्णय घेऊन डोळसपणे आयुष्य जगले पाहिजे. जगद्गुरु श्री म्हणाले की आम्हीही तुमच्यासारखा प्रपंच करतो, प्रपंच सोडला नाही परंतु गुरुकृपेने आम्ही परमार्थाचा राजा होऊ शकलो. हे केवळ निरपेक्ष, निरीच्छश्रद्धा भावामुळे शक्य झाले, जसे रामदास स्वामी म्हणतात "परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी" त्यामुळे तुम्हीही प्रपंचात राहून परमार्थ करू शकता.


 आपणच स्वतः आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहोत व आपण स्वतःच आपल्या अडचणी सोडवतो फक्त दहा मिनिटे उक्त नामस्मरण म्हणजेच भक्ती करणे गरजेचे आहे. भगवंत तुमच्या माझ्या सगळ्यांच्या हृदयात विराजित असून फक्त तो ओळखता आला पाहिजे. आपण त्यांच्या चरणाशी अखंड शरणागत झालो पाहिजे. आपलं संपूर्ण जीवन त्यांच्या चरणावरती अर्पण करून "मारणार तोच, तारणार तोच" असा श्रद्धाभाव ठेवून गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे व समर्पित भावनेने गुरूंना शरण गेले पाहिजे. 


आपली जशी भगवंतावर श्रद्धा असते तसाच तो फळ देत असतो, जर तुम्हाला खरंच सुखी व्हायचं असेल तर फक्त आणि फक्त दहा मिनिटे भक्ती करा आणि स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. प्रवचनाच्या शेवटी स्वामीजींनी सगळ्यांना आशीर्वाद दिले. 

           दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी जगद्गुरुश्रींचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्यामध्ये 182 भाविकांनी साधक दीक्षा घेतली. आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाला 23 ते 25 हजार भाविकांनी उपस्थित राहून जगद्गुरुश्रींच्या अमृतमय प्रवचनाच्या व दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. 

           असाच भव्य दिव्य जगद्गुरुश्रींचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम पुन्हा 10 आणि 11 फेब्रुवारी 2025 पश्चिम विदर्भ उपपीठ शेगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार आहे. अशी माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक श्री सुरेश मोरे आणि पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी दिली.

Previous Post Next Post