दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा : राहुल बोंद्रे
चिखली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी भारताला कधीही भरुन न निघाणारी जखम दिली. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी विविध राज्यातून काश्मीर पाहायला आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या हल्ल्याच्या काँग्रेस पक्षाकडून निषेध करण्यात आला असून देशाची एकता आणि अखंडता खंडित करणाऱ्या दहशतवादाचा केंद्र सरकारने कायमचा बिमोड करावा, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.
गुरुवार 24 एप्रिल रोजी चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा चिखली शहर व तालुका काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. यावेळी राहुल भाऊ बोंद्रे बोलत होते. प्रारंभी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून 26 भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, देश के सन्मान में काँग्रेस मैदान मे , दहशतवादी कारवाईचा निषेध करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी चिखली शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, डॉ.मोहमंद इसरार, सचिन बोंद्रे, प्रा.निलेश गांवडे, डॉ. सत्येंद्र भुसारी, रामभाउ जाधव, रिक्की काकडे, प्रदिप पचेरवाल, आषिफ भाई, रफिक सेठ, राजु रज्जाक, गोपाल देव्हडे, शेख खैरू, जय बोंद्रे, बिदुसिंग इंगळे, शेख जाकीर, शहेजाद अली खान, सचिन शेटे, विजय जागृत, प्रकाश सपकाळ, रवि तोडकर, डॉ. अमोल लहाने, डॉ. रविंद्र कमळस्कर, डॉ. संजय घुगे, विजय पाटील, भास्कर चांदोरे, शेख अजु, शकील भाई, अब्रार बागवान, हानिफ बाबा, मलीक भाई, गजानन वानखेडे, बिटू वानखेडे, प्रकाष चव्हाण, अजिम शेलुद, शेषराव अंभोरे, जीवनबाप्पु देशमुख, प्रल्हाद म्हस्के, परमेश्वर साळवे, शेषराव साळवे, प्रदिप साळवे, शेख अफजल, लक्ष्मण भिसे, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
ध्रुवीकरणाविरोधात भारतीयांची एकजूट महत्वाची
देशातील सर्व लोक या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आहेत. हे दहशतवादी हल्ले समाजात फूट पाडण्यासाठी आणि ध्रुवीकरण करण्यासाठी रचले गेले आहेत. आम्ही सर्व भारतीयांना एकत्र राहण्याचे आणि सांप्रदायिक सलोखा व शांतता राखण्याचे आवाहन करतो. समाजात तेढ वाढणार नाही याची आपण सारे काळजी घेऊ या, असे आवाहनही जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले.
अतिरेकी भारतात आले कसे ?
भ्याड हल्ला करणारे अतिरेकी भारतात आले कसे? त्यांना शस्त्र कसे मिळाले? ते परत कसे जाऊ शकले? यासारखे प्रश्न उपस्थित करून कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली. अतिरेकी धार्मिक तेढ निर्माण करतात मग ते देशातील असो की देशाबाहेरील. मानवतेला काळीमा फासणाऱ्यांना केंद्र सरकारने धडा शिकवावा, आम्ही भारतीय म्हणून त्यांच्या पाठीशी असल्याचेही बोंद्रे म्हणाले.