विकासपर्व 2.0....
चिखली: मुस्लिम धर्मियांसाठी रमजानचा महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो.त्यातही रमजान ईद ही या महिन्यातील पवित्रतेचा सर्वोच्च बिंदू मानल्या जाते.मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या या दिवशी वळती येथील मुस्लिम समुदायासाठी शादी खाण्याचे लोकार्पण करून आमदार सौ श्वेताताई विद्याधर महालेे यांनी वळती येथील मुस्लिम समुदायाला ईदची भेट दिली आहे.
वळती येथील मुस्लिम समुदायाकडून आमदार श्वेता ताई विद्याधर महाले यांना मुस्लिम निकाह सारखे प्रसंग, छोटे सत्कार समारंभ आयोजित करण्यासाठी शादी खाण्याची मागणी केली होती.त्यांच्या या मागणीला सकारात्मक स्वरूप देत आमदार सौ श्वेताताई विद्याधर महाले यांनी पवित्र इद्च्या दिवशी या शादी खान्याचे लोकार्पण केले.
"दुसऱ्या कोणत्याही धर्माचा अनादर न करता आपल्या धर्माचा आदर व पालन केले जावे, हीच संविधानाची आणि प्रत्येक धर्माची खरी शिकवण आहे.अल्पसंख्याकांचा वापर करून घेऊन त्यांना दारिद्र्यात खितपत ठेवण्याचे आणी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धार्मिक ध्रुवीकरण करून गरीब अल्पसंख्याक मुलांचा वापर आपल्या अवैध कामासाठी करण्याचे महापाप अनेक दशके सत्ता उपभोगणाऱ्या विरोधकांनी केले आहे.परंतु सत्तेत बदल झाल्यानंतर सर्व धर्माचा आदर ठेवूनही खरा विकास आणि धर्मनिरपेक्षता जपता येते हे महायुती सरकारने सातत्याने दाखवून दिले आहे.काँग्रेसने आधी 70 -75 वर्षात जो खोटा प्रचार चालवला आहे,त्याचे कारण त्यांना फक्त अल्पसंख्यांक समुदयाचा वापर करून आपल्या सत्ता टिकवायच्या होत्या हे संपूर्ण मुस्लिम समाजाणे समजावून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सौ. श्वेताताई महाले यांनी केले.
समाजातील सर्व घटकांसाठी विकासाचे दरवाजे उघडे असून,मूलभूत विकासासाठी आपण नेहमीच सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.याप्रसंगी वळतीच्या सरपंच उज्वला ताई चिंचोले, उपसरपंच असलम भाई, प्रदेश कार्यकारणी सदस्य शहजाद पटेल, सामाजिक कार्यकर्ते मुज्जू सौदागर, वरती गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील चिंचोले, रामकृष्ण चिंचोले, जफर सर, अखिल सौदागर, नईम् सर ,जावेद पटेल, सईद पटेल, बादशाह शेख, अजीम कादरी, भारत गायकवाड, उद्धव चिंचोले, साबीर खान ,रिजवान खान तथा ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
चिखली विधानसभा...