"चिखली पॅटर्न" आता राज्यभरात....

 



आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नाने "जिवंत सातबारा" मोहीम राज्यभरात सुरु..

लोकहिताची तळमळ असली की लोकनेता आहे त्या परिस्थितीत अधिकाधिक सुधारणा करून आपल्या लोकांचे जीवनमान अधिक समृद्ध,सुखी व विकसित कसे होईल याचा विचार नेहमीच करत असतो.परंतु परंपरागत चालत आलेल्या "शासकीय काम आणि सहा महिने थांब" या प्रवृत्तीमुळे अधिकारी व पदाधिकारी यांना जनतेशी बांधिलकी ठेवून त्यांचा विश्वास हस्तगत करणे जरा जिकिरीचे राहिले आहे.त्यातही महसूल विभागाचे काम म्हणजे कामाला किती वेळ लागेल याचा काही नेम नाही.परंतु अशातच चिखलीच्या विद्यमान आमदार सौ श्वेताताई विद्याधर महाले यांनी घरातील जबाबदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांना तलाठी व तहसील कार्यालय यांच्याकडे वारंवार चकरा मारण्याचे काम पडू नये,यासाठी चिखली येथे "जिवंत सातबारा" ही मोहीम राबवण्यास महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सुचित करून त्यांच्याकडून मृत व्यक्तीच्या वारसांना त्वरित व दीर्घ आणी क्लिष्ट प्रकियेशिवाय वारस नोंदी घेण्याचा पायंडा सुरु केला,आमदार सौ श्वेताते महाले यांनी सुचवलेल्या या कल्पनेला मूर्त रूप देण्याचे आणि ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य चिखलीचे कार्यतत्पर तहसीलदार श्री संतोष काकडे यांनी केली. आणि आता चिखली येथे सुरू झालेला हा पॅटर्न संपूर्ण राज्यभरात राबवण्याचे आदेश माननीय राज्यपाल यांनी महसूल व वन विभाग मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार दिले असून,"जिवंत सातबारा मोहिम" अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. या दृष्टीकानातुन संपूर्ण राज्यात " जिवंत सातबारा मोहिम राबविण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे.
आमदार सौ श्वेताताई विद्याधर महाले यांच्या कल्पनेतील हा "जिवंत सातबारा" पॅटर्न आता राज्यभरात राबवला जाईल.

शेत जमिनीच्या मूळ मालकाचा मृत्यू झाल्यानंतर वारसाहक्काने ती मालमत्ता मृताच्या वारसदारांच्या नावे केली जाते. मात्र वारस नोंदीत येणाऱ्या अडचणी व दीर्घ प्रक्रीयेमुळे अनेकांची प्रकरणे अडकून पडलेले असतात. याचा सर्वाधिक फटका प्रामुख्याने शेतकऱ्यांना बसतो. वेळीच सातबारावर नोंदी होत नसल्याने पीएम किसान, पिक कर्ज, पिक विमा, अॅग्रीस्टॅक तसेच कृषी व इतर विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित राहतात. केवळ वारस नोंदी अभावी होणारी ही परवड पाहता शेतकऱ्यांची ही मोठी अडचण सोडवून मयत व्यक्तींच्या वारसांच्या नोंदी सातबारा सदरी पूर्ण करून घेण्यासाठी आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या सुचनेनुसार तहसीलदार यांनी चिखली तालुक्यातील १५९ गावांमध्ये "जिवंत सातबारा" मोहीम राबविली. महसूल विभागाच्या १०० दिवस कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत १ मार्चपासून संपूर्ण जिल्हाभरात ही मोहिम राबविण्याचे निर्देश मा. जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना दिले.दरम्यान शेतकरी हिताच्या या मोहिमेस प्रारंभापासून लोकप्रतिनिधी म्हणून पाठबळ पुरवणाऱ्या आमदार श्वेता महालेंनी शेतकरी हिताची ही मोहिम संपूर्ण राज्यभरात राबविली जावी, यानुषंगाने महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली तसेच सदर मोहिम राज्यभरात राबविण्याची मागणी केली.
ना. बावनकुळेंनी देखील याची दखल घेतली असून लवकरच संपूर्ण राज्यात ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्याने 'जिवंत सातबारा'चा चिखली पॅटर्न तालुकास्तरावरून आता थेट राज्यस्तरावर पोहचला आहे.

यासंबंधी माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये काढण्यात आलेल्या शासकीय निर्णयामध्ये "जिवंत सातबारा" ही मोहीम राबवण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम राबवण्यासाठी आदेशित करण्यात आले असून, न्यायप्रविष्ट प्रकरणे वगळता गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करून ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार त्वरित करून सातबारा दुरुस्त करावा आणी सातबाऱ्यावर जिवंत वारसांच्या नोंदीच राहतील यासंबंधी सुचित करण्यात आले आहे.

या जिवंत सातबारा मोहिमेकरिता तहसीलदार यांना तालुका समन्वय अधिकारी पदी नियुक्त करण्यात आले असून, प्रत्येक जिल्ह्याकरता जिल्हाधिकारी ही त्या जिल्ह्याचे नियंत्रण अधिकारी म्हणून कार्य करतील.

आमदार सौ श्वेताताई महाले या नेहमीच त्यांच्या, वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण कल्पनांनी आपल्या मतदारसंघांमध्ये विकास कामांचा धडाका सुरू ठेवत असतात काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व गावांमध्ये महिला बचत गटासाठी "बचतगट भवन" देण्याचे जाहीर केले आहे.महिला सबलीकरण व समाजाची विकासाकडे वाटचाल होण्याकरता त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कल्पना नेहमीच चर्चित व मदतपूर्ण देखील असतात.आता त्यांच्या सुपीक डोक्यातून निघालेली जिवंत सातबारा ची ही कल्पना राज्यभरात राबवली जात असल्याने त्या कौतुक आणी आदर यांच्या नक्कीच पात्र ठरतात.
Previous Post Next Post