*ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात कार्यवाही*
*नागरिकांनी मानले चिखली पोलिसांचे आभार*
नितीन फुलझाडे
चिखली:- गेल्या काही दिवसापासून चिखली शहर व परिसरात मोबाईल गहाळ व चोरीचा घटना वाढल्या होत्या या संदर्भात ठाणेदार संग्राम पाटील यांनी एक टीम नेमून तब्बल 21 मोबाईल अंदाजे किंमती 2,86,000/- रुपये एव्हढ्या किंमतीचे मोबाईल मोठ्या शिताफीने हस्तगत करून संबंधित मोबाईल धारकांना ते परत करण्यात आले.
सविस्तर असे की पोलीस स्टेशन चिखली हद्दीत मागील काही काळापासुन मोबाईल गहाळ झाल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असल्याने चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी पोलीस अंमलदार विजय किटे, सुनिल राजपुत, महीला पोलीस अंमलदार रुपाली ऊगले यांचे पथक स्थापन करुन सदर पथकास गहाळ मोबाईल शोधण्यासाठी योग्य त्या सुचना दिल्या. सदर पथकाने गोपनिय व तांत्रीक माहीतीच्या आधारे विविध ठिकाणावरुन विविध कंपनिचे एकुण 21 मोबाईल किंमती 2,86,000/- रुपयाचे हस्तगत केले असुन सदर मोबाईल मुळ मालकांना परत केले आहे. किंमती मोबाईल परत मिळाल्याने नागरीकांनी पोलीस विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, मा.अपर पोलीस अधिक्षक बि.बि महामुणी, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, ठाणेदार पोलीस स्टेशन चिखली, पोहेकॉ विजय किटे,पोकॉ सुनिल राजपुत, पोकॉ रुपाली उगले, पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे.
Tags
चिखली पोलीस....