नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचा राज्यस्तरीय सोहळा...
खामगाव (खबरे शामतक)ः गेली 10 वर्षे समाजभिमुख कार्य करणाऱ्या नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद असून अशा संस्थांना आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी सीएसआर फंडातून तसेच दानशूरांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला पाहिजे, असे आवाहन माजी पोलीस महानिरीक्षक मोहन राठोड यांनी गोरेगावात केले. नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा मुंबईच्या गोरेगाव (पूर्व) येथील नंदादीप विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यस्तरीय नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सामाजिक, आरोग्य, क्रीडा कला, प्रशासकीय, उद्योग या व विविध क्षेत्रातील 16 जणांना शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र तुळशीचे रोपटे देवून गौरविण्यात आले. या सोहळ्याचे आयोजन या ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी केले होते. जोगेश्वरी पूर्वचे उबाठाचे आमदार अनंत (बाळा) नर यांनी नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टच्या नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांच्या कार्याचा गौरव केला. विशेष म्हणजे ते आमच्या मतदारसंघात असल्याचा अभिमान असून त्यांच्या मागे खंबीरपणे मी आणि माझा पक्ष उभा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी पंजाब व हरियाणाचे माजी न्यायमूत अरुणकुमार चौधरी, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ वकील व समाजसेवक जगदीश जायले, प्रसिद्ध साहित्यकार इमरान राही, काँग्रेस नेते क्लाइव्ह डायस, निर्माता दिग्दर्शक सुनील दर्शन, कामगार नेते अभिजीत राणे, उद्योगपती ईश्वर रणशूर, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, जेष्ठ पत्रकार मनोहर कुंभेजकर, समाजसेवक आशिष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री गणेश कलामंच यांनी पारंपारिक नृत्य सादर केले. यावेळी अशोक जसवानी (बुलढाणा), गणेश चंदनशिवे (मुंबई), कुसुमताई अलाम (गडचिरोली), प्रतिष्ठा काळे (यवतमाळ), के. आर. बजाज (नागपूर), डॉ. महेश अभ्यंकर (मुंबई), हर्षदा घोले (मुंबई), रमेश होतवाणी (नागपूर), विजय गायकवाड (मुंबई), रविद्र देडीये (मुंबई), गणेश हिरवे (मुंबई), प्रतीक्षा शेलार (मुंबई), धनंजय पवार (मुंबई), ऋतुजा देवकर (मुंबई), महेश सोनवले (मुंबई), सुषमा कुर्ले (मुंबई) आदी राज्यातील सत्कारमूतचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अशोक जसवानी यांना यापूव मिळालेले पुरस्कार
सायं.दैनिक खबरे शामतक चे संपादक अशोक जसवानी यांना यापूव खामगाव प्रेस क्लबच्या वतीने स्व.बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार, महेश परिवाराच्या वतीने जिल्हास्तरीय महेश रत्न पुरस्कार, तर 6 जानेवारी 2025 रोजी हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या वतीने मलकापूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथे राज्यस्तरीय नवक्षितीज पत्रकारिता पुरस्कार देवून त्यांचा 19 जानेवारी रोजी सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार सुभाष जोशी व सैय्यद अकबर यांचाही नवक्षितीजच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सदर बातमी आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित करावी.
आपला विश्वासू
अशोक जसवानी