चिखली : मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करणाऱ्या कर्तव्यदक्ष आमदार म्हणून श्वेताताई महाले यांनी अल्पावधीत आपली छाप सोडली आहे. माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांच्यानंतर श्वेताताई महाले यांच्या विकासकार्यामुळे शहर व ग्रामीण भागात विकासाचे नवे वारे वाहू लागले आहेत. आ. महाले यांनी केलेला विकासकार्य येथील जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारी असल्यामुळे या विधानसभा निवडणुकीत आ. श्वेताताई महाले यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे यांनी केले. १८ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे व आ. श्वेताताई महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत जयस्वाल मंगल कार्यालयात आयोजित चिखली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महायुतीच्या वतीने चिखली विधानसभा मतदारसंघात आ. श्वेताताई महाले या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. श्वेताताई महाले यांना संपूर्ण मतदारसंघात अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. श्वेताताईंच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील हिरीरीने सहभागी झाला असून पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते शहर व ग्रामीण भागात श्वेताताई महाले यांचे प्रचारकार्य जोमाने करत आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने तत्पूर्वी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन शंतनू बोंद्रे यांनी केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी श्वेताताई महाले यांच्या विजयासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे सरकार लोककल्याणकारी कार्य करत असून या सरकारच्या अनेक योजना जनतेच्या पसंतीस उतरल्या आहेत. महायुती सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळे मला देखील चिखली मतदारसंघात भरभक्कम विकासकामे करता आली. त्यामुळे आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा मला संधी मिळावी याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची खंबीर साथ मला आवश्यक आहे व ती मला निश्चितच मिळेल असा विश्वास यावेळी बोलताना आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला.
चिखली पंचायत समितीचे माजी सभापती एड. ए. टी. देशमुख, धाड येथील ग्रामपंचायत सरपंच कमलताई बोर्डे, दिगंबर जाधव, निलेश देठे, अशोक पाटील, त्र्यंबक दांदडे, प्रशांत एकडे, एड. एस. सी. पवार , निवृत्ती परिहार, सुभाष देव्हडे, रवींद्र डाळिंबकर, विलास वसू, विश्वंभर शेळके, जगन्नाथ तारगे, तौफिक भाई यांच्यासह मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.