वाचनाने कल्पनाशक्तीचा विकास होतो- बबनराव कानकिरड


अकोला- वाचनाने बहुश्रृतता प्राप्त होऊन दृष्टी व्यापक होते व कल्पनाशक्तीचा विकास होतो असे प्रतिपादन भाषा तज्ज्ञ  बबनराव कानकिरड यांनी केले.
 बाबूजी देशमुख वाचनालयाचे वतीने वाचन संकल्प अभियान अंतर्गत वाचन कौशल्य कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
बाबूजी देशमुख वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्रा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. स्तंभलेखक प्रा. डॉ. मोहन खडसे व हिंदी भाषा साहित्यीक प्राचार्य डॉ. रामप्रकाश वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.  व्यक्तिमत्व विकासात वाचन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे .या वाचन प्रक्रियेत शब्द बोध, वाचन दिशा, पुनरुदृष्टीक्षेप, दृष्टी चा आवाका, शब्द उच्चारण, आकलन, आस्वादन, शब्दग्रहण, शब्द संग्रह हे घटक आत्मसात करणे आपल्या सर्वंकष विकासाचा पाया असल्याचे प्रतिपादन केले. 
व्यक्तिमत्व विकासात वाचनाचे अपार महत्व आहे म्हणून विद्यार्थ्यांनी वाचन कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन हिंदी भाषा साहित्यीक प्राचार्य डॉ. रामप्रकाश वर्मा यांनी कार्यशाळेत संबोधित करताना  केले.
 कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मोहन खडसे यांनी केले.
 सर्पमित्र बाळ काळणे, प्रशांत लोडम, ग्रंथपाल सुरेश टेके, सहाय्यक ग्रंथपाल सतीश डगवाले, जुगलकिशोर शिरसाट, नितीन कदम, स्वप्निल राठोड, सुनील मिश्रा यांच्यासह शालेय , महाविद्यालयीन, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी व वाचकांची प्रामुख्याने  उपस्थिती होती.
Previous Post Next Post