चिखलीत शेतकरी पुत्रांचा आक्रोश : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन




चिखली: शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी दि. १९ मार्च रोजी चिखलीत अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.यावेळीआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यां प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी संवेदनशील शेतकरी पुत्रांनी केले
एक दिवसीय अन्नत्याग केला.याप्रसंगी तालुक्यातील असंख्य शेतकरी पुत्र उपस्थित होते.

१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी कुटुंबासह पवनार आश्रमात आत्महत्या केली होती. या घटनेला ३९ वर्षे पूर्ण झाले तरी शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र भर शेती समस्यांची जाणीव असलेले अनेक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते दरवर्षी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करतात. यावर्षीही हे आंदोलन महाराष्ट्र भर केले जाणार आहे त्याचाच भाग म्हणून चिखली तालुक्यातील व परिसरातील दरवर्षी आंदोलन करणारे शेतकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते यावर्षी देखील चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दि.१९ मार्चला  सकाळी १२ वाजता हे आंदोलन करण्यात आले.आंदोलन पुर्णपणे सामाजिक स्वरूपाचे होते.जवळपास सर्वच पक्षातील शेतकरी पुत्र या आंदोलन स्थळी उपस्थित होते.
पक्षविरहीत तथा राजकारण विरहीत असल्याने शेतकऱ्यां प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थितांनी आपले विचार देखील मांडले आणि शेतकऱ्यां साठी एकत्रितपणे काम करण्यासाठी दिशा ठरविण्यात येणार असुन लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी ठरविण्यात आले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही थांबलेले नाही. नुकतेच राज्य पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी कैलास नागरेंनी आत्महत्या केली. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या व्यथा अधिक तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शासनाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.


शेतकरी आंदोलनाला पुन्हा पहिल्यासारखी धार आणावी.....
एक दिवस एकत्र येऊन आणि उपवास करून थांबण्यापेक्षा शेतकरी स्वातंत्र्याची लढाई राजकीय पक्षांचे व संघटनांचे जोडे बाहेर काढून एकत्रितपणे लढण्याची तयारी करावी. 
शेतकरी आंदोलनाला पुन्हा पहिल्यासारखी धार आणावी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी शेतकरी नेत्यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र यावे. 
सरकारकडून हवे ते पदरात पाडून घेता येईल फक्त त्यासाठी एकजुटीने जोरदार लढा देण्याची गरज आहे 
शेतीसाठी नवीन प्रयोग जोड व्यवसाय जीएम बियाणे शेतीचा खर्च कमी करणे अशा गोष्टींवर भर देण्यासाठी स्वतंत्र शिबिरे घेण्याची पण गरज असल्याचा सुर याठिकाणी निघाला.

आंदोलनात संवेदनशील नागरिकांचा सहभाग....
शेतकऱ्यां प्रती आपल्या भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी संवेदनशील नागरीकांनी
या आंदोलनात सहभाग नोंदवून शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी आपण संवेदनशील आहोत हे दाखवुन दिले.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली अर्पण करुन राष्ट्र गीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली.
Previous Post Next Post