लोक केंद्रीत प्रशासन पद्धती वापरा


तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची व्हिसीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने नियोजन करावे. नागरिकांना पादरर्शक, गतिमान व कालवध्द सेवा देण्यासाठी लोक सेवा हक्क(राईट टू सर्विस) कायद्याची अंमलबजावणी करावी. नागरिकांना ॲानलाईन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात. ई-ॲाफिस प्रणालीचा वापर वाढवावा. शहर आणि कार्यालय परिसर स्वच्छ ठेवावे. नगरपरिषदेप्रती नागरिकांतून चांगले मत व्यक्त होण्याच्या दृष्टीने काम करावे. शहरातील अतिक्रमणावर समन्वयाने कारवाई करावी. घंटागाड्या नियमित सुरु ठेवाव्यात. ओला व सुका कचऱ्याचे व्यवस्थापन करावे. शहरात साफसफाईचे काम करणाऱ्या नगरपालिकेच्या स्वच्छता दूतांचा सन्मान करावा. सिटीझन कॅार्नर सुरु करावे. नगरपालिकेत लोक केंद्रीत प्रशासन पद्धती वापरावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी सर्व नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले.

Previous Post Next Post