पद्मविभूषण डाॅ. मोहन धारिया जन्मशताब्दी निमित्त अकोल्यात18 व 19जानेवारीला वनराई बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन


अकोला-- माजी केंद्रीय मंत्री,वनराईचे संस्थापक  पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक 18 व 19 जानेवारी2025 रोजी अकोल्यात वनराई बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले असल्याची माहिती वनराई युथ फाऊंडेशनचे बबनराव कानकिरड व गजानन चौधरी  यांनी दिली आहे.    
          2024हे वर्ष पद्मविभूषण डाॅ. मोहन धारिया यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. वनीकरणासाठी प्रचंड जन आंदोलन उभे राहावे म्हणून वनराई चळवळीची स्थापना केली. विद्यार्थी आणि वृक्षसंपत्तीला ते देशाची अंकुर शक्ती समजत होते. उदयोन्मुख भारताच्या उज्वल भविष्यासाठी वन समृद्ध भारत असणे व पडीक जमिनीचे हिरवाईत रुपांतर करणे गरजेचे आहे यासाठी त्यांनी जनआंदोलन उभे केले.त्यांच्या विचारांना  कृतिशील अभिवादन करण्यासाठी येत्या 18 व 19 जानेवारी2025 रोजी अकोल्यात वनराई बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.या संमेलनातून विद्यार्थ्यांच्या अंकुर शक्तीला पर्यावरण आंदोलनासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या 'एक मूल- एक झाड', 'आपले आरोग्य-आपली परसबाग', 'वनराई  बालकुमार सभा'अशा पर्यावरण विषयक कृतीशील उपक्रमांचे सादरीकरण करण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव जागृती करण्यासाठी हे संमेलन प्रेरणादायी ठरेल.
          कृषी, सिंचन,शिक्षण व पर्यावरण क्षेत्रातील कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांना या संमेलनासाठी निमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.कृषी व पर्यावरण विषयक पुस्तकांची जत्रा ही या संमेलनाचे प्रमुख आकर्षण असेल. साधारण 100 शाळांतील विद्यार्थी प्रतिनिधी वृक्ष संवर्धनाचा संकल्प या बालकुमार साहित्य संमेलनात करणार आहे.
Previous Post Next Post